आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोणत्या आजारांवर उपचार होतात?

या योजनेंतर्गत करोना, कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघे आणि हिप रिप्लेसमेंट, वंध्यत्व, मोतीबिंदू अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात.

एका कुटुंबातील किती लोकांचे आयुष्मान कार्ड काढता येतात?

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील किती लोकांचे कार्ड काढता येतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य संख्येबाबत कोणतीही मर्यादा नाही. जे या योजनेसाठी पात्र आहेत, ते आयुष्मान कार्ड काढू शकतात.